" काव्य " हे सारस्वतांचे एक वाड्ःमयीन शक्तिपीठ आहे . दुर्गा , अंबा , चंडी , काली , भवानी ह्या आणि अशा देवता जशा एकाच शक्तीची अनेक रूपे आहेत ; त्याचप्रमाणे गीत , अभंग, ओवी , मुक्तछंद , लावणी , पोवाडा , दोहा , गझल , रुबाई इ. विविध स्वरूपांतून कविता प्रकट होत असते . . .
. . . देवतांतील देवत्व आणि कवितांतील कवित्व ह्यांच्यात तत्त्वतः फरक नाही ; म्हणून भाविक आणि रसिक ह्यांच्यामधील आंतरिक नाते हे मुळात मनोगम्य असल्याने आध्यात्मिक नातेच आहे !
- वा . न. सरदेसाई
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा